![]() |
बाई वाड्यावर या..! |
![]() |
सामाजिक बदल आणि इतिहासाकडे जाण्याची प्रेरणा The Other Side of Silence*** पुस्तके देऊ शकतात… |
श्रीमंतीच्या झगमगाटात, डोक्यावर दिवस रात्र पदर घेवून राहणाऱ्या त्यांच्या हक्काच्या बायका पुरुषांना सहसा विरोध करत नसत. केला तरी तो कोणाच्या पचनी पडत नसे. कारण घरात पुरुषाचा धाक असे.
बऱ्याच ठिकाणी अश्या उपेक्षित स्त्री ला, मुलं होवू दिली जात नसत. कारण ती इस्टेटीत वाटा मागतील ही भीती त्यामागे असे. आणि चुकून बाई कधी मुल जन्माला घारणार असेल, तर त्यांना ठराविक वनस्पतीचा काढा पाजण्यात येई. व प्रचंड वेदना झेलून त्या स्त्रीला रिकामी केली जात असे. असले अघोरी उपचार करूनसुद्धा एखांदी बाई गरोदर राहिलीच. तर तिच्या मुलाच्या जन्मांतर काही वेळातच त्या राहत्या ठिकाणी अथवा त्याच्या मागच्या बाजूला परूसभर खोल खड्डा खोदून ती मुलं जिवंतपणी गाडली जात. पण बाहेरच्या माणसाला याची काहीच खबरबात मिळत नसे. कारण ती स्त्री कधी कोणाच्या नजरेसही पडत नसे. काहीजण तर तिला माडीवरच घमेल्यात आंघोळ करायला लावून भरलेलं पाण्याचं घमेलं खोलीच्या बाहेर आणून स्वत: ओतायचे. म्हणजे काही रंगेल माणसं तर तरुणपणी जे बाईला वाड्यात कोंबायचे. ते तिचं मेल्यानंतर मढेच बाहेर काढायचे.
![]() |
ध्यान, मेडिटेशनचा भाग म्हणून Meditation Incense Sticks वापरू शकता… |
माझ्या वाचण्यात आलेलल्या सत्य घटनेवर आधारीत एक लेख मला आठवतोय, “ते पोर जन्माला येई, तेव्हा त्याला वाड्यात खोदलेल्या खड्ड्यात पुरताना ते चिमुकलं बापाकडे बघून ओठातून हसलं. मग बापानं क्षणभर विचार केला अन दया येऊन खड्यात टाकलेल्या त्या जीवाला वर काढून वाढविला.” पुढे मोठे झाल्यावर त्याला “उपरस” म्हणून साऱ्या पंचक्रोषित ओळख मिळाली.
त्यामुळे अशा उपेक्षित बाईचा वापर फक्त जन्मभर भोगण्यासाठीच केला जाई. सालभरात एखाद्या जत्रेत बाईच्या अंगावर नवं लुगडं, चोळी चढायची. त्यावरच ती समाधान मानायची. आणि आपला जन्म भोगण्यासाठीच झाला आहे अशी मनाची तयारी करून ती बाई आलेला दिवस ढकलत राहायची.
बाकी, 'बाई वाड्यावर या' म्हणून आज नाचणाऱ्या आताच्या मूर्ख पिढीला बाईचं हे अवघड जागेचं दुखणं कधीच नाही समजणार.....! डिजीयुगंधरा प्रस्तुत..!
![]() |
If you have any query, please let me know.